पहिले-वहिले

08 06 2008

थरथर हाती लिहिलेले
नवथर भावे भिजलेले
स्मृतिगंधाने दरवळले
पत्र तुझे पहिले-वहिले!

‘प्रिय’शब्दाने सजलेले
हॄदयातुन जे रुजलेले
अलगद पत्रात उतरले
लाजरे बोल ते पहिले

मुग्ध गूज ओठांवरले
नजरांनी होते कथिले
सांगण्या शब्दही स्फुरले
ते पत्र तुझे गे पहिले..

बहु दिवसांनी सापडले
पुस्तकी जुन्या दडलेले
आज पुन्हा आठवले
काळिज ते धडधडलेले !

कोण आहे

31 05 2008

ठरविले त्यांनीच होते मी कोण आहे
कोण मी हे सांगणारा,मी कोण आहे!

शपथा त्या स्मरुन आज वचने तुझी
खिन्न हासला आत तो कोण आहे

श्वास रोधुन बैसलो होतो किनार्‍यावरी
श्वास घेण्या की निघेल जो कोण आहे

तो जाणतो,मन राखण्या माझे परि
हिंडतो शोधीत माझ्यासवे कोण आहे

रंगला वादंग व्यर्थ कुरुक्षेत्री भासतो,
युधिष्ठिरही मीच आणि मी द्रोण आहे

पाहीन म्हणतो त्यास मीही एकदा
पाहसी माझ्यात जो,तो कोण आहे

संपले आयुष्य सारे शोधही थंडावले
आणि आले आज दारी हे कोण आहे !

जमाखर्च

27 05 2008

तसं आमचं फारसं जमत नाही
आमचं कशावरच एकमत नाही
तिच्या शिवाय मन रमत नाही,
मी नसता तिलाही करमत नाही !

आमचं शांततामय सहजीवन
टिकवायचा प्रयत्न करतो,
ती दूरवर दिसली तरी
मी चटकन उभा रहातो !

माझं तिच्याआधी येणं
तुम्हाला आवडेलसं नाही
तिचं माझ्यापूर्वी असणं
नेहेमीच घडेलसं नाही

मी नाहीच अन फक्त ती ?
एक दिवास्वप्न भोळं..
ती नसताना केवळ मी ?
आधी दिवाळी, मग दिवाळं !

रंगमंचावर मिरवायला मी
पडद्यामागून पुरवायला ती
घराघरात असतो आम्ही
माझं नाव खर्च,तिचं…प्राप्ति !

राहून गेले

17 05 2008

बोलणे कित्येकदा होऊन गेले
सांगणे प्रत्येकदा राहून गेले

सत्य उठुन दिसलेच नाही
उठून बघणे राहून गेले

आसवे रुसवे गेले विरोनी
हासणे स्मरणात राहून गेले

गुंग बघण्यात सर्वांसवे मी
पाहणे बरेचसे राहून गेले

वेळ अपुल्यांना असतो कधी
अनोळखी चौकशी करुन गेले

कोण चुकले हिशेब राहुद्या
जाउद्या व्हायचे होऊन गेले

पोरका एकटा नव्हतो कधीही
विरह माझ्यासवे नांदून गेले

काय शोधण्या मी आलो इथे
विसरलो,शोधणे राहून गेले !

जागुनी जगलो

11 05 2008

तिमिरात उषेचे स्वप्न घेउनी जगलो
मी हार गळ्यातील हार मानूनी जगलो

संदर्भ रोजचे कालबाह्य होताना
मी इतिहासाला उरी घेउनी जगलो

तुडवून फुलांना खुशाल ते जाताना
मी कर्ज कळीचे शिरी घेउनी जगलो

मी त्याच ठिकाणी रोज ठेच खाउनही
त्या क्षितिजावरती नजर ठेउनी जगलो

जगण्याच्या धुंदीत तोल तुझा जाताना
मी मात्र नशेचे भान लेउनी जगलो

तू वार्‍यावरती शब्द उधळिले आणि
मी त्या शब्दांना नित्य जागुनी जगलो

आयुष्य आजचे समोरुनी येताना
मी हाय ! उद्यावर त्यास टाकुनी जगलो

रूबरू

06 05 2008

वो बैठे हैं रूबरू और शाम ढलने को है
दरमियाँ का शीशा अब पिघलने को है
छोड़ आया बीच मझधार यादों को तेरी
डूबती यह नैया अब सम्हलने को है
क्या है ये शोरो-गुल, क्यों धुआँ सा है
शायद फिर कारवां निकलने को है
तेरे संग तराशे थे जो नाजों से हमने
वक़्त का दरिया वो लम्हे निगलने को है
मैंने जल्दबाजी में काटी है जिंदगी,पर
इतमिनान से बड़े दम निकलने को है
रोज नया ऐलाने-जंग सुनता हूँ मैं
देखें कौन इंसानियत कुचलने को है
मुद्दतों बाद हल्की मुस्कुराहट ये कैसी
जानता हूँ अब ये लावा उगलने को है

सुबह

02 05 2008

नहीं जानता मैं कि उस ओर क्या है
यहाँसे जुदा वहाँ और क्या है
जहाँ रोशनी है, वहाँ कुछ तो होगा,
अनबनीमें शायद नया सचभी होगा…
सवालोंमें उलझासा दिलका जहाँ है
परखूँ जवाबोंको  फुरसत कहाँ है
नहाता उजालेमें कोई कल तो होगा
भरा उम्मीदोंसे कोई पल तो होगा ?
मैं हूँ मानता कि यह रस्ता नया है
सिवा हमारे न कोई गया है
पुकारे है मंझिल और जानाही होगा
होनी है सुबह दिनको आनाही होगा !

रूप कविताके

02 05 2008

जीवनमें कविता,
हर रुपमें मिलती है
कभी भावुकताकी छायामें, कभी
दर्शनकी धूपमें खिलती है.
कभी सहास्य सखी चंद्रमुखी,
अनजान अधोवदना, कभी दुखी
कभी बन बहना पहन गहना
बन दुहिता, कभी पितृवदना !
ममताभरी कभी लोरी दुलारी
पड गलबैंया मारे किलकारी
तबस्सुममें वह यौवनके खिले
सिसकती कभी झुर्रियोंमें  मिले..
कहे खुलेआम मनकी,आंखोही आंखोंमें
कनखियोंसे करे बात कभी सलाखोंमें
आजाद परिन्दोंमें ,सरहदकी गश्तोंमें
हालातके बंधोंमें, ख्वाबोंकी किश्तोंमें.
परिचित लिखावटकी अनखुली चिट्ठियोंमें
किसी नवजातकी अधखुली मुट्ठियोंमें..
अनबुझी चाहोंकी अनसुनी आहोंमें
निष्ठुर थपेडोंमें,सहलाती बाहोंमें
रदीफोंके मुहल्लोंमें,काफियोंके काफिलोंमें
अपने हिस्सेके अंधेरोंमें,गैरोंके उजालोंमें
आँखोंकी नमीमें, अपनोंकी कमीमें
कविता पनपती है, दिलोंकी जमींमें !

गीत उरावे

27 04 2008

सांगावे हे गुज वाटावे
अधिर ऐकण्या ते भेटावे
शब्द लाजरे हळु रेटावे
अंतर मौनातले फिटावे
सांगायास विलंब न व्हावा
ऐकल्यावरी धीर रहावा
मायेला आरसा मिळावा
छायेतच कवडसा मिळावा
मीलनक्षण असा खुलावा
एक कटाक्षी जीव भुलावा
गुलाब गालांवरी फुलावा
हर्षभराने देह झुलावा
मंद गंध शब्दांना यावा
लज्जेचा निर्बंध गळावा
स्पर्शांतुन नव अर्थ रुजावा
आवेग मनीचा व्यर्थ न जावा
शब्दांचे मग काम सरावे
काय सांगणे ते विसरावे
मिटोनिया सारेच दुरावे
मधुर एक ते गीत उरावे !

ये असा

27 04 2008

बघ एकांत, बसू निवांत, जीवनाचा हट्ट आहे
भेटल्यावर काय बोलू, हे जरा अस्पष्ट आहे
पचवुनी आकांत माझे, शांत जग हे झोपलेले
जागवु त्याला कसे हे काय करणे इष्ट आहे ?
सुखमहाली दंगलो मी, दु:ख दारी तिष्ठले
स्वागता गेलो न म्हणुनि मजवरी ते रुष्ट आहे
कसे म्हणू तू एकदाही, भेटलीस मज नाही
आलीस,म्हटलेस ‘नाही’,त्यात मी संतुष्ट आहे !
पाहिले स्वप्नीच होते,वास्तवाचे स्वप्न मी
भानावर आलीस तू,रोजची मज गोष्ट आहे !
ये असा बाहूंत माझ्या, आसवांना वाट देऊ
स्वच्छ डोळ्यांनी उद्याला, पाहू कोणा कष्ट आहे…