पिकतं तिथे विकत नसतं , खरंय.
पण म्हणून…….
पिकवणं कुठे थांबत असतं !
ऐकणारं कुणी नाही म्हणून ..
संभाषणही संपवायचं नसतं.
साथीला कुणी नसलं तरी
चालणं थांबवून चालत नसतं,
जगाशी पटलं नाही म्हणून
जसं, जगणं संपत नसतं.
वाचायला कुणी नसलं तरी
लिहिण्याचं वेड वाचवायचं असतं.
‘ मग हे सगळं का करायचं?’
विचारत बसायचं नसतं–
अंतर्नादाच्या साक्षीनं,
आपलं गाणं गायचं असतं !
प्रतिक्रिया व्यक्त करा